
प्रत्येकायच्या आयुष्यात असावं असं एक ठिकाण म्हणजे,जिथे सगळया चूका माफ असतात आणि समजून घेण्याची अपेक्षा असते.काय बोलू त्यांच्याबद्दल,कितीही काहीही बोललं ना तरी खरच आपणच चुकीचे ठरतोय.हे खरं आहे की आई बाबा झाल्याशिवाय त्यांचं सुख दुःख नाही कळत.
लहानपणी आपण नको त्या गोष्टींचा केलेला हट्ट असो किंवा दहा वेळा एकाच गोष्ट,अ अ अ करून विचारलेले असू देत. त्यांना त्याचा कधीच कंटाळा आलेला नसतो. किती ही कंटाळून आलेला बाबा आपल्याला अगदी हसत हसत समोर जातो , किंचित ही तो चिडलेला आहे किंवा खूप दमून आला आहे असं कधीच दाखवत नाही. आपल्याला आवडले गोष्ट कधी आपल्याला तो देतोय असं त्याला वाटत असते,तो फक्त आपल्या चेहऱ्यावरचा निर्मळ आनंद पाहण्याचा समाधान शोधत असतो. एक बाबा होणं म्हणजे सगळ्यात कठीण रोल आहे,हे त्यावेळी नाही समजत. जेव्हा तो रोल निभावतो ना तेव्हा त्या यातना कळतात. न कळत झालेल्या चूक पण खूप काही सांगून जातात.
आई बद्दल तर काय सांगणार असा सागर आहे तो जिथं माया प्रेम कधीच संपूच शकत नाही. केव्हा पण जावा तुम्ही वेळी अवेळी,रात्री अपरात्री जिथं तुम्हाला कधीच नाही शब्द ऐकायला मिळणार नाही. कितीही डोक्यात विचार असू देत खूप ताणतणाव असू दे पण तिच्या कुशीत गेले की रडून मोकळं होईल होते. खरच ,
आई विना स्वामी तिन्ही जगाचा खरच भिकारी आहे.
पण ना दिवस पुढे गेलेत आता,मागे वळून पाहिले तर केलेल्या चुकांची कबुली आहे फक्त. मागचे दिवस आठवले की असं वाटतं त्यावेळी का नाही काहीच कळाले.का एवढा मोठा अपराध केलेत की त्याची माफी मागण म्हणजे अजून मनात अपराधी पणा वाटू लागते. खरच कधी दिसलेच नाही , दिसण्यापेक्षा त्यांनी कधीच दाखवलं नाही आणि मी पण कधी त्याचा विचार च केला नाही.
काळजी होती ती,प्रेम होतं ते,आपल्या जीवाचा तुकडा ते सांभाळत होते ते. आपल्या पेक्ष्या जास्त काळजी त्यांनाच होती खरं तर पण आपल्याला ??
पण आपल्याला ला तर मैत्रीण हव्या होत्या,आणि कास आहे ना सगळ्यांचेच आई बाबा असेच असतात. खूप काळजी घेणारे पण असं कोणी सांगितले च नाही. मनावर हेच बिंबत गेले की आई बाबा खूप कडक असतात. कस वागायचो ना,फक्त चीड चीड अणि काही विचारलेच तर तस नसते ग आई आता असंच चालू ये. शाळा, कॉलेज, हे सगळं कुठे होत नाही तो पर्यंत आपले करिअर समोर असते. ते सेट होत नाही तो पर्यत आपले आयुष्य पण तर नव्याने चालू करायचे असते ना आपल्याला. या सगळ्यात आई बाबा सोबत असतात आपल्याला कशाची कमी पडू नये म्हणून,पण आपण कुठे असतो ज्यांनी आपल्याला सगळं दिले त्यांना आपण आपला साधा वेळ पण नाही देऊ शकलो. जाता जाता रडू येत खूप त्यातच ते समजून घेतात की कसं राहणार लेकरु आपले, सगळ्या व्यापातून कधी तरी दोन दिवस काढायचा आणि त्यांच्या नावे म्हणून येण्याचा खर की त्यांच्या साठी म्हणून त्यांचं ऐकुन घेतो का वो आपण परत आपलेच चालू होते. आणि कधी दोन दिवस संपतात,कळतं च नाही. असेच दिवसा मागून दिवस निघून जाते आणि आयुष्यही संपून जाते.
आपल्या मुलांचे आई बाबा होणं खरच खूप सोपं आहे वो पण आपल्याच आई बाबा चे मुलगा होणं आणि वेळे प्रसंगी त्याचा च आई बाबा होणं त्याहुन ही कठीण आहे.
या कोरोना मध्ये खूप मुलं आपल्या जन्मदात्याना भेटली. खरच सगळयांना देवाने दिलेला वेळ च होता की आता तरी काय तरी करा जे राहून गेलेय. जे फक्त आठवणी मध्ये आहे ते आता सत्यात येऊ द्या.
आई बाबा अस नात आहे खर ते अनुभवायला ना स्वतः आई बाबा झालं ना की खरच कळते.

.


