Categories
Uncategorized

नियती…

कस असते ना ज्यावेळी आपल्या कडे काहीच नसते ना त्यावेळी खरच आपले पण आपले नसतात. वेळ आपली तर सगळं आपले,नाहीतर सगळे असून पण नसल्यासारखे असतात.खर सांगायचं झालं ना तर वेळ ही सगळ्यांची येते फक्त कोणाची कधी लवकर येते तर कधी कोणाची उशिरा येते पण ज्यापण वेळी येते ना बाप बनून जाते राव!!

ज्यावेळी खरच म्हणजे आम्ही लहानच असू त्यावेळी म्हणावी अशी काही परिस्थिती छान नव्हते,म्हणजे आमच्यासाठी ती चांगलीच होती आणि आम्ही सगळे जण त्यात खुश होतो. आमचा आमच्या नशिबावर तेवढाच विश्वास होता जेवढा आमच्या आई बाबा च्या कष्टावर होता. हे ही दिवस निघून जातील या आशेवर आम्ही छान जीवन होतो. कोणाला कधी कळलंच नाही की स्वप्न आमच्या डोळ्यात आहे आणि हातात आमच्या ताकद आहे. म्हणजे अजून ही तो दिवस माझ्या आई च्या डोळ्यात पाणी आणून जातो. खूप लांबची नाही हो,जवळच्याच आमच्या आत्या, आमच्या शेजारून जायच्या पण आमच्या सोबत बोलयाच्या नाहीत. येताना खूप खाऊ घेऊन यायच्या पण आमच्या साठी नाही ,आमच्याच चुलत भावंडे यांच्यासाठी. आम्हाला त्याच काही कधीच वाटायचे नाही कारण आमच्या बापाने आम्हाला कधी काही कमी पडूच दिले नाही. खूप अवहेलना केली म्हणे आमची.आम्ही लहान होतो म्हूनन वेळेनुसार सगळं विसरून गेलो पण, ज्यांनी हे सोसले होते त्यांच्या मनात हे घर करून राहिले होते. कारण दिवस आमचे नव्हते.

आज बरेच दिवस झालेत,पण आता त्यांच्या डोळ्यात तिने दिलेल्या वागणुकीचा प्रचंड प्रमाणात राग तयार झालाय आता. रोज वाद नको म्हणून बोलन पण कमीच झालाय तिच्या विषयीच. आपली वेळ वाईट होती म्हणून ती अस वागली असं बाबा सांगत असतात आम्हाला,पण आता वेळ तिची वाईट आहे हे तिनेच सांगितले आम्हला.

काल फोन आला, बाबा कामात असल्याने नाही उचलला गेला त्यानच्या कडून,परत करायचं ते राहून च गेले. अगदी सहज च झाले सगळं. आई च्या फोन वर आला, आवाज थकून गेला होता,आता तिला भावाच्या घरी येण्याचं होतो. छान मजेत राहायचे होते. या दोघांच्या पण मनात राग होताच पण आज वेळ तिची वाईट आहे म्हून ते तिच्या सारखे नाही वागले. आधार दिला तिला,तुझंच घर आहे कधी पण ये ग! तू आल्यावर अजून रौनाक येईन बघ. तिचा आवाज जड झाला होता. जीव मोठा झाला होता. शब्द फुटेना झालते. लवकर येते म्हणले आणि फोन ठेवला. मागचे दिवस आठवुन सगळे शांत बसले होते.

कस असते ना,ज्यावेळी आपली वेळ खरच वाईट असते ना तेव्हा खरच कशाची अपेक्षा नसते ठेवायची. जवळची माणसे तर पाहिले आपले वैरी बनतात. पण ज्यावेळी आपली वेळ चांगली असते ना तेव्हा मात्र आपण मन मोठे ठेवायचं. कोणी आपल्यासोबत कस वागायचे हे आपण नाही ठरवू शकत आपण आपली वागणुक नक्कीच ठरवू शकतो ना! मनात राग राहण्यापेक्षा लोभ राहिलेला कधी पण चांगलंच की!

Awesomelifejourney's avatar

By Awesomelifejourney

Tomorrow will be different than yesterday.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started